Sunday, July 19, 2009

आठवणी

अशाच आठवणी मग ऋतू बदलतात
ग्रीष्मातल्या पानांप्रमाणे त्याही सुकून जातात
हिरवा रंग प्रेमाचा विरळ होत जातो
जाळीदार पानांप्रमाणे मनाला छिद्रे पडतात

खूप यत्न केला तरी छिद्रे भरत नाहीत
रडावस वाटल तरी आसव गळत नाहीत
डोळे मिटले की भूतकाळात मन धावत
म्रुगजळामागे पळताना वेड मन थकत

अशा वेळी वाटत नको त्या आठवणी
नको ते डोळ्यात काठोकाठ भरलेले पाणी
तेव्हा कोठे अंधार्‍या रात्रीसारख हसावस वाटत
एखादा तारा तुटल्यावर काजव्यांशी खेळावस वाटत
:- अजय कोरपे


Friday, July 10, 2009

पानिपत(Panipat) - (तिसरे युद्ध: मराठा - अहमदशाह अब्दाली)

छत्रपती शिवाजी महाराज यानी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेणार्‍या पेशव्यांच्या काळात पानिपताच्या मैदानात घडलेल्या मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्या युद्धात मराठयांची एक संपूर्ण पिढी मारली गेली. त्या युद्धात वीरमरण पावलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात सैनिकांना माझा मानाचा मुजरा.
या कवितेत मांडण्यात आलेल्या व्यक्तिरेखांची ओळख खालील प्रमाणे आहे:
सदाशिवराव पेशवे (भाऊ) : पानिपताच्या युद्धाचे सेनापती / चिमाजी आपा पेशवे यांचे पुत्र
विश्वासराव पेशवे : नाना साहेब पेशवे यांचे जेष्ट पुत्र
समशेर् बहाद्दर : बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा पुत्र
गारदी (इब्राहीमखान गारदी) : मराठ्यांचा तोफखाण्याचा प्रमुख / मूळ देश : आफ्रिका
लालमणी : सदाशीव राव पेशवे यांच्या घोड्याच नाव

संकल्पना:
युद्धात भाऊसाहेब पेशवे आणि त्यांचे मावळे यांच्याशी गळेभेट करण्यापूर्वी, युद्धाच्या आदल्या रात्री मृत्यू (यम) भाऊसाहेब पेशवे यांच्या फडात प्रवेश करतो. आणि त्यांच्याशी संवाद साधतो.
येथे मी पानिपत चे युद्धा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे, कोठे जर काही चुकीच लिहल असेल तर चुकी लक्षात आणून द्यावी.ही नम्र विनंती.

पानिपत
मृत्यू दारी आला अन् फडाबाहेर थांबला
पानिपताच्या बोचरया थंडीत गारठून गेला
माझी नजर पडताच, थोडा गहीवरुन गेला
अन् आज्ञा मिळताच फडात येऊन बसला

काही शब्द प्रेमाचे तो माझ्याशी बोलू लागला
मधेच आमच्या मर्दांगीला शाबासकी देऊ लागला
आमच्या अडचणीची त्यालाही फिकीर होती
माझ्या मावळ्याना शेवटी त्याचीच साथ होती

एकटक नुसता तो माझ्याकडेच बघत होता
खोलवर मनात त्याला "विश्वास" दिसत होता
ते कोवळ पोर जेव्हा माझ्या सोबतीला दिल
त्याच्यासाठी मुठीत माझ्या कोठून बळ आलं ?

आमची हिंमत पाहून त्याचीही छाती फुगली
रिकामी खळगी पाहून बोबडीहि थोडी वळली
का लढत होतो आम्ही ? अन् कुणासाठी ?
दिल्लीच्या रक्षणासाठी आणि वचनाला जगण्यासाठी..

गनिमहि तसा खूप कंटाळून गेला होता
छोट्याश्या एका प्याद्यासाठी तोही लढत होता
ना नफा ना तोटा त्याला मिळणार होता
सरतेशेवटी खरारा काढणार्‍यांच्या घशात जाणार होता

आदल्या दिवशी विश्वासला डोळे भरून पाहिले
त्याची कांती पाहून मग मृत्युचेही डोळे दिपले
स्त्रियांमधे "मस्तानी" तर मर्दांमधे तोच होता
दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला मर्द मराठा होता


तांबडे फुटण्याआधी यमाने माझा निरोप घेतला
कोंड्याची चतकोर भाकर खाऊन तोही तृप्त झाला
सवयी प्रमाणे मग मी बाराशे नमस्कार घातले
सूर्याला अर्ध्य देऊन मग चिलखत चढवले

पहाटे पहाटे सगळ्यानाच स्फुरण चढले
गनिम पाहून मग हात शिवशिवू लागले
गारद्यानी तोफा डागून लढाईला तोंड फोडले
"हर हर महादेवा" च्या डरकाल्या मावळे फोडू लागले

तहान भूक विसरून सगळे आग ओकू लागले
रक्ताने माखलेल्या हाताने रक्त पिऊ लागले
मर्दांगीचे भूत जणू विश्वास रावांत घुसले
भरलेल्या छाताडावर शत्रुंचे वार झेलले

विजय मला आता स्पष्ट दिसत होता
दुरुनच हसर्‍या चेहर्‍याने खुणावत होता
आनंदाने माझ्या मनी यशाच्या उकल्या फूटल्या
पुढच्या क्षणाला मग दुखाच्या ठिणग्या उडाल्या

लढता लढता माझा "विश्वास" रणांगणात हरवला
जमिनीच्या कुशीत तो मर्द मराठा सुखावला
अंबारीतुन "लालमणी" वर मग मी झेपावलो
फुरफूरनार्‍या लालमणीहून मीही गर्दीत मिसळलो

पातीला पातीला घासून आगीच्या ठिणग्या उडाल्या
तितक्याच मला गारद्यांच्या निर्जीव माना दिसल्या
कोण्या देशातला तो? का आपल्या साठी लढला?
भगव्याखाली लढणारा तोही मर्द मराठा जाहला

तिरपी किरणे सूर्याची डोळ्यावर येऊ लागली
लढता लढता डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली
वाट माझ्या सुटकेची होती जरी मोकळी
डोळ्यांसमोर "विश्वास" ची आकृती दिसू लागली

रक्ताचा सडा जणू त्या पनिपतावर सांडला
मातृभूमीला आगळा अभिषेक मराठ्यांनी घातला
नंगी सांशेर घेऊन मग सांशेर सुद्धा खूप लढला
"बाजीरावा" चा पुत्र म्हणून रण-मैदान गाजवला

सरते शेवटी लढता लढता "समशेर्" ही मुर्च्छित पडला
शेवटच्या श्वासपर्यंत "भाऊ" च त्याला दिसला
तलवारीच्या घावांनी मग मीही शांत झालो
मृत्यूला दिलेले वचन पळून मीही निद्रीस्त झालो


:- अजय कोरपे

Thursday, June 25, 2009

वडील

निवडुंगाचा काटा कधी, कधी मायेचा कल्पवृक्ष
आशेचा दिपस्तंभ कधी, नेहमीच खात्रीचा वटवृक्ष
कोणाबध्दल बोलतोय मी? तुम्हीच कोड्यात पडलात
बोट धरून चालायला शिकवले..त्यालाच कसे विसरलात

चिमटा लकढून पोटाला, तुमच्या मुखी घास भरले
झुकले नाही कधी परिस्तिथिला, स्वाभिमानात जगले
स्वत:च्या इच्छा-स्वप्नांना शेवटी जिवंतपनी पेटवले
अंगणात वाढणार्‍या रोपट्यांना तळ्हातावर जपले

सुखी संसारासाठी ते क्षणाला काही तरी कमावत होते
तेव्हाच कधीही परत न येणारे क्षण ते गमावत होते
अंगणातल्या कळ्यांनीच त्यांच्या कष्टाचे चीज होणार होते
उमळलेली काळी पाहून एखादं स्वप्न पूर्ण होणार हॉट

कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात त्यानाही एकटेपणा वाटत होता
खूप दूर जाताना त्यांच्याही पापण्या दाटत होत्या
फरक एवढाच होता की, त्यांच्या पापण्या ओलसर नव्हत्या
याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात भावना नव्हत्या
:-अजय कोरपे

Thursday, June 18, 2009

कधीच नाही उमगले

कधीच नाही उमगले
नक्की असते काय प्रेम?
आगीत झोकणार्‍या पतंगासारखी
असते का अविवेकी झेप?

:- अजय कोरपे

कातरवेळी तिची शांत सावली

कातरवेळी तिची शांत सावली
आज वेगळीच भासत होती
ती जरी समोर होती
मात्र प्रियसी दिसत नव्हती
:- अजय कोरपे

माझ्या अंगणातला परिजातक

माझ्या अंगणातला परिजातक
केव्हाच सुकून गेला होता
तुझी आठवण करता करता
गंधही हरवून बसला होता
:-अजय कोरपे

दूर जाताना तुला काही देण्यासाठी

दूर जाताना तुला काही देण्यासाठी
माझ्याकडे काहीच शिल्लक नव्हते
म्हणूनच शेवटचे काही अश्रू
तुझ्याच साठी जपून ठेवले होते
:- अजय कोरपे

खळखळाट करणार्‍या झर्‍यासारखी

खळखळाट करणार्‍या झर्‍यासारखी
तू माझ्या जीवनात आलीस
आणि कधीही परत न येणार्‍या
लाटेसारखी कायमची निघून गेलिस
:- अजय कोरपे

Friday, May 29, 2009

काही क्षणात झालेली मैत्री

काही क्षणात झालेली मैत्री
शेवट पर्यंत टिकते, अस ऐकलय
म्हणून आपल्या मैत्रीची
मी परीक्षा घ्यायची ठरवलय
:-अजय कोरपे

Monday, May 25, 2009

माझ्या आयुष्यात येणारी परी

माझ्या आयुष्यात येणारी परी
खरच कशी हो असेल?
माझ्या इवल्याशा साम्राज्याची
खरच का सम्राज्ञी ती शोभेल?

नाकी डोळी रेखीव असेल की
मनानेही तेवढीच सुंदर असेल?
माझ्या इवल्याशा घरट्याला का
आपल मानणारी असेल?

शृंगार करणारी असेल की
कंबरपण कसणारी असेल?
संसाराच्या गाड्याला ती का
अखंड साथ देणारी असेल?

खूप बडबड करणारी असेल का
माझही कधी ऐकून घेणारी असेल?
मी लपविलेल्या अश्रूना का
पदरात पाडून घेणारी असेल?

असे खुळे प्रश्न सध्या
काळ्या आकृतींना विचारतोय
मित्रसुद्धा चेष्टेने विचारतात
"मधेच कोणाशी बोलतोय?"

काय सांगू त्याना मी
तुझीच वाट पाहतोय
जिला कधीच पहिले नाही
तिच्यावर जीवपाड प्रेम करतोय

:- अजय कोरपे

Sunday, May 24, 2009

इतरांसारखी मला सुद्धा पावसात

इतरांसारखी मला सुद्धा पावसात
भिजण्याची खूप आवड आहे
त्याच दिवशी वर्षभराच सगळ रडून
घेण्याची माझी जगावेगळी सवय आहे
:- अजय कोरपे

Sunday, May 17, 2009

Nice Quotes - 1

Overdose of anything leads 2 DEPRESSION & then KILLS U, b it love, trust or
EXPECTATIONS.....


The inevitable truth of life: " Every1 in ur life is going 2 hurt u sooner or later" U just have 2 realise who is worth?? The Pain or the Person??

A Person is alwaz "used".....it depends whether u r using some1 or u r being used by some1.....

Monday, May 11, 2009

आपण दोघे माळेमधले अगदी

आपण दोघे माळेमधले अगदी
आजु-बाजूचे मणी होतो
कधी नीट निरखून पहिलेस का?
दोघेही परस्पर भिन्न टोकावर होतो
:-अजय कोरपे

आयुष्यात भेटणार्‍या सर्वच जणांना

आयुष्यात भेटणार्‍या सर्वच जणांना
मित्र म्हणून मानता येत नसत
संकटाच्या वेळी जे साथ सोडत नसतात
त्याना कधीच विसरता पण येत नसत
:- अजय कोरपे

माणसानी खरच कधीतरी

माणसानी खरच कधीतरी
दुसर्‍यांसाठी जगल पाहिजे
सूर्या एवढ जरी जमल नसल
ज्योती एवढ तरी जळल पाहिजे
:- अजय कोरपे

मीही आजकाल थोडा उपाशी

मीही आजकाल थोडा उपाशी
राहण्याचा प्रयत्न करतोय
माझ्या ताटातील एक घास
दुसर्‍यांसाठी बाजूला करतोय
:- अजय कोरपे

माझ्या विरुद्ध वाहणार्‍या वार्‍याची

माझ्या विरुद्ध वाहणार्‍या वार्‍याची
मला खूप चीड आली होती
नंतर माझे मलाच उमजले की
दिशा तर मीच बदलली होती ना ! ! !
:- अजय कोरपे

Sunday, May 10, 2009

कातरवेळ आणि समुद्रकिनारा

कातरवेळी समुद्राकाठी मला
सुंदर कविता सुचली
हाती पेन पेन्सिल नसल्याने
वाळुतच ती मी लिहिली

अशी कविता क्वचितच
कोणी केली असावी
जी वाचण्यासाठी सुर्यानेही
मावळतिची वेळ वाढवली

जे जे काही मनात होते
ते सर्व काही वाळूत कोरले
मनातल्या भावनांचे कोठार
काही क्षणात रिकामे झाले

सुंदर अशी कलाकृती
त्या वाळूत साकार झाली
ढगात लपलेल्या चंद्राची
मग उत्कंठा शिगेला पोहचली

आजूबाजूचे सर्व काही
त्या कवितेत तल्लीन झाले
त्याना जोडीला लाटेचे
छान पार्श्व-संगीत लाभले

काही क्षणात सागराला
तुफान भरती येणार होती
अभय दिलेल्या शब्दाना आता
जीवंत समाधी मिळणार होती

लाटेंच्या तडाख्यात प्रत्येक
शब्द धारतीर्थी पडला होता
फेसाळलेल्या लाटांत मी
शब्द जोडू लागलो होतो

अजूनही ते शब्द जोडण्यासाठी रोज
कातरवेळी समुद्राकाठी जातो
पुन्हा नवीन कविता रचून
तिला वाळूत पुरून येतो
:-अजय कोरपे

Thursday, May 7, 2009

वाटल, उभी असशील वाट पाहत

वाटल, उभी असशील वाट पाहत
तू माझी पुढच्या वळणावर
मीही वळणे घेत राहिलो
सोडूनि सगळ सरणावर
:- अजय कोरपे

प्रेमाची गाडी

माझ्या स्वप्नांवर तिचा
जागता पहारा असतो
तिच्या नजरेचा वेध
माझ्या ह्रदयावर असतो

असं वाटत आता
सुटतील तिच्या नजरेतून शब्द
आणि करतील सार विश्व
एका क्षणात स्तब्ध

डोळे बंद करून तिच्या
मनात शिरण्याचा यत्न करतो
पून्हा अयशस्वी प्रयत्न माझा
नेहमी प्रमाणे फसतो

थेट तिच्या मनाची वाट
कधीच नाही सापडली
माझी प्रेमाची गाडी
पून्हा एकदा घसरली
:- अजय कोरपे

Wednesday, May 6, 2009

तू दूर गेलीस म्हणून मी

तू दूर गेलीस म्हणून मी
आसवे गाळत बसणार नाही
एक लाट ओसरली म्हणून
दुसरी यायची थांबणार नाही
:- अजय कोरपे

Monday, May 4, 2009

जस पाणी घेऊन निघालेले ढग

जस पाणी घेऊन निघालेले ढग
कधीच वाळवंटापर्यंत पोहचत नाहीत
तसच मी पाठवलेले निरोप
कधीच तिच्या पर्यंत पोहचत नाहीत
:- अजय कोरपे

आकाशाला गवसणी घालण्याच धाडस

आकाशाला गवसणी घालण्याच धाडस
आयफेल टॉवरने सुद्धा दाखवल
त्याच्या सर्वोच्च्य टोकाहून सुद्धा
आभाळ आहे तेवढच दूर वाटल.....
:- अजय कोरपे

Wednesday, April 29, 2009

मुसळधार पावसात गारा वेचताना

मुसळधार पावसात गारा वेचताना
तुझ्याच आठवणी येत होत्या
आणि जेव्हा भानावर आलो
तेव्हा गाराही वितळल्या होत्या

:- अजय कोरपे

आयुष्याच्या एका वळणावर

आयुष्याच्या एका वळणावर
जेव्हा तुझी माझी भेट झाली
मला असे वाटले माझ्या
सात जन्माची कोडी सुटली

:- अजय कोरपे

Tuesday, April 28, 2009

मन

"मन"

माणसांची पाच ज्ञानेंद्रिये कोणती हा दुसरी नाहीतर तिसरीतला हमखास प्रश्न. त्यामुळे आई बाबा पाठीवर चपलांचे, पट्ट्यांचे किंवा झाडूचे रट्टे देऊन ह्या प्रश्नाचे उत्तर चांगलेच रटुन घ्यायचे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही माणसांची पाच ज्ञानेंद्रिये. डोळ्यानी चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या याचा प्रथम दर्शी पडताळा होतो. कान वाईट आणि चांगल्या गोष्टी जसा राजहंस दूध आणि पाणी वेगळे करतो अशाच प्रकारे वाईट आणि चांगल्या गोष्टी वेगळे करतात.तशाच प्रकारे जीभ "चव", नाक "गंध" आणि त्वचा "स्पर्श" ज्ञान देते.

पण जशी जशी इयत्ता वाढत जाते तशी तशी ही ज्ञानेंद्रिये ही विकसित होत जातात. आणि त्यांची व्यक्‍तिगत परिमाणे पण बदलत जातात. काहीना सुंदर वाटणारे देखाव्यांच इतराना सोयर-सुतक पण नसत. काही मेथीचे लाडू चवीने खातात तर काही त्याच्या आजुबाजूला पण फिरकत नाहीत. असे का होते? कधी केलाय का याचा विचार? नाही ना? वाटलच होतो? कारण असा काही लिहीण्यापूर्वी मीही कधी विचार केला नव्हता... हे हे हे .. :) शाळेमधे फक्त पाचच् ज्ञानेंद्रिये शिकवली होती पाच पांडवांसारखी. पांडव जसे सहा होते तशीच ही ज्ञानेंद्रिये पण सहाच आहेत. आणि कर्णाप्रमाणे नेहमीच उपेक्षित राहिलेल सहाव इँद्रीय म्हणजे "मन".

मन हे मानवाच एक अदृश्य अंग आहे. ज्याचा खरा ठावठिकाणा अजुन विज्ञानाला पण नाही लागला आहे. हेच माणसाच ब्रम्हांग आहे. ज्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टींची तुलना करतो, चांगल काय वाईट काय याची मीमांसा करतो आणि आयुष्यात काही योग्य - अयोग्य निर्णय घेतो. हे मन म्हणजे एखाद्या रिमोट कंट्रोल सारखे आहे ( रिमोट कंट्रोल साठी मराठी शब्द माहीत नाही आहे, आपणास माहीत असल्यास सुचवावे. धन्यवाद). जर आपला मनावर ताबा नसेल तर आपण मनातल्या हातातला रिमोट कंट्रोल होऊ आणि आपला मनावर ताबा असेल तर आयुष्यातला प्रत्येक चित्रपट आपल्या आवडीचा असेल.

हे मन खूप चंचल असते, कधी या तर कधी त्या फुलावर बसणार्‍या भुंग्यासारखे असते. जर वेळीच ते नियंत्रणा खाली नाही आणले की तुमचा मनावरचा ताबा सुटतो आणि युध्धात उध्वस्त झालेल्या विमानाप्रमाणे तुम्ही आयुष्यात हेलकावे खाउ लागतात.आणि तशा स्तिथीत जस विमानवर ताबा मिळवणे कठीण होऊन जाते तशीच अवस्था मग अस्थिर मनाला स्थिर करताना होते.

तुम्ही घाबरून जाउ नका, कधी कधी हेच हेलकावे खाणारे विमान तुम्हाला जगाच्या एका टोका पासून दुसर्‍या टोका पर्यंत सेकॅंडाच्या एक शतांश वेळेमधे पोहचवू शकते. असा तुफान वेग असतो मनाचा. संभाळून हां...नाहीतर अपघात व्हायचा..:) असा वेग अजुन सूर्याच्या किरणांना पण गाठता आला नाही आहे कारण रात्री नंतर पहाटे पहाटे पहिल्या सूर्या किरणानी भुमी न्हाहून निघायला तब्बल काही तासांचा अवधी लागतो. पण मनाच काय तुम्ही आता ठरवल की रात्र होते आणि तुम्ही ठरवल की दिवस पण !!!!

तुमच सगळ आयुष्य तुमच्या मनावर अवलंबुन असत. समजा वाळवंटाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत निघालेल्या दोन प्रवाश्यांपैकी एक मनाने खूप दुर्बळ आहे. वारंवार फसवणार्‍या म्रुगजळामुळे खूप हताश झालेला आहे आणि दुसरा त्या म्रुगजळाचा पाठलाग करून सुद्धा हरला नाही आहे. सहाजिकच पहिला प्रवासी वाटेतच दगावणार. कारण हे नाही आहे की तो शरिराने थकला होता की त्याला पुरेसे पाणी मिळाले नाही. कारण हे आहे की त्याच्या मनाने प्रतिकूल परिस्तिथित पराभव स्वीकारला होता.मात्र दुसरा प्रवासी भर वादळात सुद्धा वाळवंटाच्या दुसर्‍या टोकाला पोहोचतो आणि तेही पाण्याचा एक थेंब ही न पिता.

उत्तर तुमच्या समोर आहे.तुम्हीच आता विचार करा ???? तुमच्या बेंभान, मोकाट सुटलेल्या मनाला तुमच्या अधिपत्याखाली आणा.तुम्ही मनाच्या अधिपत्याखाली जाउ नका नाही तर तुमच परिपत्य नक्की आहे.

Monday, April 27, 2009

"Alchemist" :- Paulo Coelho

  1. Failure is nothing more than learning how to win.
  2. In dreams begins responsibilities.
  3. Manage by Mind and Lead by Heart...
  4. It is not because things are difficult that we do not dare; it is because we do not dare that they are difficult.
  5. Promise keeping, aggressive listening, being consistently compassionate and finally and perhaps most importantly truth telling :- Secrets to the incredible relationship
  6. Every time you avoid doing right, you fuel the habit of doing wrong.
  7. Listening to what others have to say is mark of respect.
  8. *** One of the greatest gift you can ever give anyone is giving them 100% of your attention.
    "Listening truely is the highest compliment."
  9. Stop listening with the intent to respond, instead listen with the intent to understand.
  10. Small actions can have big consequences.
  11. Time slips through our hands like grains of sand, never to return again. Have the courage to embrace and enjoy life as you travel through it.
  12. The person who tries to do everything achieves nothing. so the real secret to getting things done is knowing what things need to remain undone.
  13. As you live your days, so you live your life.
  14. The tougher you are on yourself, the easier life will be on you.
  15. The greatest battle we fight take place within ourselve.

Inspirational thought from "Like the flowing river"

Be like the flowing river,
Silent in the night.
Be not afraid of the dark.
If there are stars in the sky, reflect them back.
If there are clouds in the sky,
Remember, clouds like the river, are water,
So, gladly reflect them too,
In your own tranquil depths.
:- Manuel Bandeira

आता मला लागले

आता मला लागले
परतीचे वेड
कधी होईल मित्रांशी
माझी भरतभेट
:- अजय कोरपे

गाने बहूत गाये थे हमने आपकी फर्माईश मे

गाने बहूत गाये थे हमने आपकी फर्माईश मे
हसे बहूत थे तुम्हे हसाने के लिये
हसके अलविदा करेंगे ए दोस्त तुझे
रोयेंगे उसके बाद तुम्हे भुलाने के लिये
:- अजय कोरपे

Sunday, April 26, 2009

Some quotes from "Mind-Your-Mind" :- By Remez Sasson

  • In order to make changes in our life, we have to make changes in our thinking process.
    One single thought is not strong enough to make a change; but if the same thought is repeated, it gradually gains strength. A thought that is often repeated takes roots in the subconscious mind and from there it affects our lives and even our environment.

    The great thing about this process is that we don’t need to strain or overexert ourselves to make it happen. All we have to do is to choose a thought that we want to come true and repeatating it.
  • When your thoughts, feelings and moods become steady and under your control, your life also becomes under your control. You become the deciding factor not outside influences or passing moods.
  • Your thoughts and feelings can draw or repel success. They shape your belief and expectations about success or failure.
    Thoughts too often come and go and change direction like the wind. They influence your mind the same way that the wind affects the direction of a flag. One moment the flag may be fluttering this way and moment later in a different direction. One moment you might be thinking in this way and moment later in a different way.
  • Concentration and Will-Power
    In order to make control your thoughts, feelings and moods, concentrations and will-power need to be developed. Concentration and will power constitute the steering wheel of your life, with which you can navigate the boat of your life towards success and achievement.
  • It is important to learn to be more positive, less critical and less worried. Then when success is achieved, you can enjoy the happiness of realization.


त्वरित निर्णयाचे महत्व.

त्वरित निर्णयाचे महत्व.
निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे हे अधिक बरे. एकवेळ चुकीचा निर्णय घेणार्‍या माणसानी जीवनात यश मिळवले आहे. परंतु जो निर्णयच् घेऊ शकत नाही, ज्यांचे मन नेहमी "हे" की "ते" या गोंधाळात गुरफटलेले असते, असा मनुष्य मात्र कधीच यशस्वी झाल्याचे ऐकलेले नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याच क्षेत्रात यश मिळवता येत नाही.
:- Unknown Author

पाशणालाही ह्रदय असतं

पाशणालाही ह्रदय असतं
तर, तेही कळवळल असतं
ठेच लागल्यावर
नाहीतर चटका नक्की
लागला असता
गरम रक्त सांडल्यावर
:- अजय कोरपे

किती फरक पडतो ना माणसांत

किती फरक पडतो ना माणसांत
लहानपणि खेळणी तूटल्यावर रडनार पोर
मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा
हसत हसत वावरत

:- अजय कोरपे

कावळा आणि कावळीचा बर

कावळा आणि कावळीचा बर
एकच रंग असतो
आपली कोणती आणि दुसर्‍याची
हाच तर खरा खेळ असतो
:- अजय कोरपे

तू आल्यापासून सध्या

तू आल्यापासून सध्या
स्वप्नांच्या दुनियेत वावरतोय
खोट का बोलाव तुझ्याशी...
वेड्यांसारख मधेच खुदकन हसतोय
:- अजय कोरपे

कधी कधी हा एकटेपणा

कधी कधी हा एकटेपणा
खूप काही सांगून जातो
जस काळ्या गर्द अंधाराला
मिणमिणता दिवा निरोप सांगून जातो

:- अजय कोरपे

मला तुझ्या मनातल

मला तुझ्या मनातल
सगळ काही ऐकायच आहे
त्यासाठी तुला मला
एकांतात गाठायाच आहे... :
- अजय कोरपे

माझ्या चारोळ्या लोकांना

माझ्या चारोळ्या लोकांना
नेहमीच अर्धवट वाटायच्या
खर तर त्यांचा शेवट
मला कधीच नाही जमायचा
:- अजय कोरपे

पाठलाग

असाच कित्येक वेळ
विचार करत बसतो
मनातल्या विचारांचा
पाठलाग करू लागतो

पाठलाग करून मात्र
काहीच हाती लागत नाही
जिथून सुरवात केली
तेथेच येऊन थांबतो
:- अजय कोरपे

तुझी आठवण

असे का व्हावे? की
मावळतीचा सूर्य पहिल्यावर
तुझीच आठवण यावी.....

तुझ्या गालावरची लाली
तांबड्या सूर्याला चढावी

मग ती सूर्यकीरणे
तांबट केसांसारखी भासावी

अंगावर अलगद पडू लागताच
उभी कांती शाहरूण जावी

:- अजय कोरपे

मैत्री ही गुलाबाच्या

मैत्री ही गुलाबाच्या
काट्यासारखी असते
त्यांची कितीही निर्भत्सना केली
तरी फुलाला तेच सांभाळत असते

:- अजय कोरपे

माझ्याही भावनांचा चिखल झाला होता

माझ्याही भावनांचा चिखल झाला होता
तुझ्यापासून दूर जाताना
मलाही काय? कल्पना होती, दुष्काळ
पडणार होतो, मी परत येताना.....
:- अजय कोरपे

नाही ऐकला तुझा आवाज की

नाही ऐकला तुझा आवाज की
उमळलेल्या कळ्या अलगद गळून पडायच्या
कधी चुकुन स्वप्नी आलीस की
कोमेजलेल्या कळ्या मग छान खुलायच्या
:- अजय कोरपे

तुझ्या सुंदर डोळ्यांतुनी

तुझ्या सुंदर डोळ्यांतुनी
दिसे उमेद उद्याची
नाही पहिले क्षणभरही
दिसे संध्याकाळ शेवटची
:- अजय कोरपे

मी एकटा - चारोळी संग्रह

तुझ्या गालावरची खळी
मनाचा एकटेपणा घालवतात
नाही ऐकला तुझा आवाज
तर मनाचा पाझर आटावतात
:- अजय कोरपे

तुझ्या दबक्या पावलाचा मागोवा

तुझ्या दबक्या पावलाचा मागोवा
वेड मन घेत असत
तू कायम माझ्या सोबत आहेस
असाच भास करून देत असत

:- अजय कोरपे

बस एक दुखन सोडून

बस एक दुखन सोडून
सगळ काही घेऊन गेलीस
कोण किती विव्हळ्त आहे
न पुसता निघून गेलीस

: - अजय कोरपे

एकाएकी जुन्या आठवणींनी

एकाएकी जुन्या आठवणींनी
मनात कालवा केला,
एका क्षणात निर्जीव कातळ
मग कसा काय विरघळला ?
: - अजय कोरपे

हळूच तुझे नाजूक शब्द

हळूच तुझे नाजूक शब्द
कानावर माझ्या पडले
मागे वळून पाहिले तेव्हा
गुलाबाचे फूल छान हसले
:- अजय कोरपे

न बोलून सुद्धा माझ्या भावना

न बोलून सुद्धा माझ्या भावना
न कळण्याएवढी तू भोळकट नव्हतीस
तुझ्या प्रेमाच्या चक्रव्यूहात
माझी अभिमन्यूची भूमिका होती
:- अजय कोरपे

काही शब्दच अपुरे पडत होते

काही शब्दच अपुरे पडत होते
भावना व्यक्त करण्यासाठी
तुझा हात हाती घेऊन
समुद्रा काठी फिरण्यासाठी

: - अजय कोरपे

चमचमत चांदण पाहील की

चमचमत चांदण पाहील की
मन एकदम दाटून येत
तूने दाखवलेल्या चांदणीकडे
मग एकटक पाहत बसत
:- अजय कोरपे

Saturday, April 25, 2009

कोणी मला विचारले

कोणी मला विचारले
कसा करतोस तू चारोळी
मी ही सांगेन त्याना
प्रेम करून बघ एकदा स्वतःशी
:- अजय कोरपे

तुझ्यविणा एकटे राहायला

तुझ्यविणा एकटे राहायला
आता मी शिकून गेलो होतो
खर तर तू जवळ असतानाच
याचीच रंगीत-तालीम मी करत होतो
:-अजय कोरपे

काही प्रश्नांची उत्तरे

काही प्रश्नांची उत्तरे ही
न मिळालेलीच चांगली असतात
कारण अशा प्रश्नाची उत्तरे
प्रश्न अधिक चिघल करतात
:- अजय कोरपे

पिल्लांच्या पोटासाठी

पिल्लांच्या पोटासाठी
चिमना घरट्याबाहेर पडला
त्यांची पोट तर भरली
पण त्यांच्या चिवचिवाटाला मुकला

:- अजय कोरपे

तू दूर जाताना सुद्धा तुझी सावली

तू दूर जाताना सुद्धा तुझी सावली
तुझी राहिली नव्हती
नाहीतर माझ बोट सोडून, ती नक्की
तुझ्या सोबत आली असती
:- अजय कोरपे

आज कुठे चार शब्द लिहावेसे वाटले

आज कुठे चार शब्द लिहावेसे वाटले
चार शब्द लिहिताना मन ही थोडे दाटले
माझ्या चार शब्दात तू नव्हती मावत
उरलेले शब्द मग डोळ्यातून होते ओघळत
:- अजय कोरपे

तुला कस सांगू

तुला कस सांगू
त्रास मलाही खूप होतो
तुला बाहू-पाशात पहिल्यावर
फास मला का बसतो?
:- अजय कोरपे

अपेक्शांचे ओझे वाहताना

अपेक्शांचे ओझे वाहताना
माणसांच्या इच्छा मरण पावतात
अशाच माणसांची का? पुढे
मेल्यानंतर भूत बनतात...
:- अजय कोरपे

कोमेजलेल्या फुलाकडे

कोमेजलेल्या फुलाकडे
फुलपाखरू फिरकत नव्हते
मला वाटले कदाचित
तेही माणसाळलेले होते
:- अजय कोरपे

कधी कधी मुर्खानाही

कधी कधी मुर्खानाही
शहाणपण द्याव लागत
आपल शहाणपण टिकवण्यासाठी
थोड मूर्ख बनाव लागत....
:- अजय कोरपे

कधी कधी खूप उंचावरून

कधी कधी खूप उंचावरून
पडण्याची भीती वाटत नाही
मनातल्या विचारांच्या खोलीपुढे
ती उंची काहीच वाटत नाही
:- अजय कोरपे

मलाही एकदा खूप

मलाही एकदा खूप
उंचावरून पडायचा आहे
थोडा वेळ का होईना..?
पण हवेत तरंगायच आहे ....
:- अजय कोरपे

त्या घोंघवणार्‍या वार्‍याचा

त्या घोंघवणार्‍या वार्‍याचा
मला खूप राग आला होता
तुझ्या मोकळ्या केसाना पाहून
तोही वेडा-पीसा झाला होता
:- अजय कोरपे

तुझ्या पैंजनांचा आवाज

तुझ्या पैंजनांचा आवाज ढगांच्या गडगडाटात ऐकला
तुझ्या केसांची झुळुक तुफानी वादळात अनुभवली
तूच असशील म्हणून पुढे जेव्हा गेलो
पुन्हा मला "खो" देऊन नवा डाव देऊन गेलिस
: -अजय कोरपे

Friday, April 24, 2009

आसवाने डबडबलेल्या पापण्यांत

आसवाने डबडबलेल्या पापण्यांत
तुझ्याच आठवणी होत्या
शेवटचा थेंब जेव्हा पाझरला
तेव्हा तुझा अधिकारही मावळला

:- अजय कोरपे

शेवटची चार पावले

शेवटची चार पावले
हातात हात देऊन चालशील का?
तू कायमची आठवणीत राहशील
असे काही क्षण देशील का?
:- अजय कोरपे

ती संध्याकाळ

ती संध्याकाळ खूपच छान होती
जेव्हा तू माझ्या घट्ट मिठीत होतीस
आपण दोघे मिठीत असे कायमचे अडकावे
तुला मला पाहून मग काजव्यानीही खूप जळावे

:- अजय कोरपे

आयुष्य

खूप सोप असत आयुष्य
आपणच गुंता करून ठेवतो
उठल्या बसल्या नुसत
नशिबाला दोष देत बसतो १

जन्मा-मरणा मधली सरळ रेष
म्हणजे असते आयुष्य
आपणच वेडी वाकडी वळणे घेत
अंतर वाढवून ठेवतो २

झर्‍यासारख खळखळत राहण
म्हणजे असते आयुष्य
आपणच डबक्यासारख थांबून
चिखल करून ठेवतो ३

आकाशाहून विशाल मन
म्हणजे असते आयुष्य
आपणच चार भिंतीत राहून
मने संकुचित करतो ४

दिव्यात जळणार्‍या ज्योतीएवढ
उबदार असते आयुष्य
आपणच त्यात तेल ओतून
वणवा पेटवून देतो ५

हातातला घास दुसर्‍यांना देणे
म्हणजे असते आयुष्य
आपणच घास हिरावून घेऊन
मने दुखवून बसतो ६

चन्दनापरी झिजने
म्हणजे असते आयुष्य
हसता हसवता अश्रू लपविणे
म्हणजे असते आयुष्य ७
:- अजय कोरपे