Sunday, July 19, 2009

आठवणी

अशाच आठवणी मग ऋतू बदलतात
ग्रीष्मातल्या पानांप्रमाणे त्याही सुकून जातात
हिरवा रंग प्रेमाचा विरळ होत जातो
जाळीदार पानांप्रमाणे मनाला छिद्रे पडतात

खूप यत्न केला तरी छिद्रे भरत नाहीत
रडावस वाटल तरी आसव गळत नाहीत
डोळे मिटले की भूतकाळात मन धावत
म्रुगजळामागे पळताना वेड मन थकत

अशा वेळी वाटत नको त्या आठवणी
नको ते डोळ्यात काठोकाठ भरलेले पाणी
तेव्हा कोठे अंधार्‍या रात्रीसारख हसावस वाटत
एखादा तारा तुटल्यावर काजव्यांशी खेळावस वाटत
:- अजय कोरपे


2 comments:

PRACHI...... said...

hey nice one.. liked the last line esp..

swati said...

supeerrrrbb........ khup chaaan.. :)